Saturday, December 21, 2024

Losing the Silver Spoon: A Pep Guardiola Story

"What is going on at Man City?", the commentator cries as the four-time defending English champions leave Villa Park having lost for the ninth time in their last twelve games.

The answer is obvious: This is the very first time that Pep Guardiola, the man the myth the legend, has had his congenital silver spoon jerked out of his mouth. In other words, the very first time in his storied, trophy-laden career that he has not been able to call upon a world-beating defensive midfielder.

In terms of entering football management with a silver spoon, only Zinedine Zidane comes anywhere near Pep Guardiola among modern-day managers. The former managed Real Madrid in two separate spells, got it just right, and hasn't done anything much else in football management. The latter, on the other hand, has managed to live long enough to see himself become the villain.

For a manager who has essentially had carte blanche at all of his jobs, it is perhaps unsurprising that Guardiola has dealt successfully with any and all player absences in his career so far. When Aguero was sold, he simply won the league with no striker - no mean feat, but made infinitely easier by having the likes of Gabriel Jesus, Raheem Sterling, Kevin de Bruyne, Bernardo Silva, and Riyad Mahrez to call upon. When Yaya Toure was sold to Man City, he simply replaced him with Javier Mascherano. When Kevin de Bruyne was injured for more than half a season, he simply replaced him with Bernardo Silva, Ilkay Gundogan, and Phil Foden.

But there is one footballing position where Guardiola has never been able to "troubleshoot":

The Defensive Midfielder.

There have been only two occasions in Pep Guardiola's managerial career where his defensive midfielder has been unavailable or subpar for a lengthy period of time. The first of these two was when Rodri was purchased to replace the aging legs of Fernandinho at Man City. Manchester City, it must be remembered, struggled quite badly with an aging Fernandinho. The second is right now, when Rodri's ACL injury has ruled him out for the whole season.

For a coach hailed by so many as a legend, an all-timer, even the GOAT, to depend so pathetically on such a unique, specialist position as Defensive Midfield defies belief. Remember, of course, that for all the noise around Kevin de Bruyne's injury, Manchester City have won a Premier League title before with Kevin de Bruyne basically being an absentee. Man City are not dependent upon de Bruyne. They are dependent upon Rodri.

Pep is not relying on a popular position to make his system work. He is relying on the nichest of niche positions. His own nichest of niche positions, as it happens - the position that he himself used to play (quite well, it must be said) in his playing days.

In other words, he is relying not on himself as a coach, but as a player. What he needs, what he so desperately craves, is a defensive midfielder who plays exactly like Guardiola himself used to play. Not just someone humble enough to want to play the unglamorous important role, but someone who has the intelligence to play it as well as Guardiola himself did.

Attacking Midfield / Forward is a glamor position. People grow up wanting to be an attacking mid. They score the goals, they get the spotlight.

Nobody grows up wanting to be a defensive midfielder, which is sad, but true nonetheless. The position has none of the glamor of attackers, even though it has more utility. Coaches may love their defensive mids, but fans live for the strikers. 

In his first job at Barcelona, Guardiola had Sergio Busquets and Yaya Toure in the DM position, readymade when he arrived at the club. Then, at Bayern Munich, he had Xabi Alonso, Javi Martinez, and Philip Lahm either readymade or purchased by the club on his demand before his tenure had begun. Then, at Manchester City, he had Fernandinho readymade when he arrived, and has now purchased, not developed, Rodri. It is natural for a manager who used to play as a defensive midfielder to want a good defensive midfielder in his team, but Manchester City's last 12 games suggest that for Guardiola, his defensive midfielder IS his system.

"Give me myself", he says, "and I shall conquer the world".

The lingering doubts with Guardiola have never been about his success, or the way he wants football to be played. They have always been about his ability to actually coach a player into improving, to make a team better than the sum of its parts, to find solutions to problems that 99.999% of football coaches have to deal with every day but evade Guardiola because of the systemic advantages he has enjoyed right from the beginning.

Guardiola's teams have always been made of such stellar parts that even producing less than their sum has been enough to win most trophies. His time at Bayern Munich, where he joined the reigning European champions but never cracked Europe, and turned a flexible, multidimensional beast into a tame, predictable big fish in a small pond, is a stark reminder of this fact.

By going on a run of 9 losses in 12 games since Rodri got injured, Guardiola has done exactly nothing to dispel these doubts. He has highly successful as well as highly promising midfielders aplenty in his team, and yet every time the opposition spring a counterattack against Man City these days they seem sure to score. 

Guardiola can fix all problems and win any trophy - as long as he has the world's best player in the nichest of niche postions, that is. Preferably with the world's best players in all the rest of the positions, of course.

This is a man, remember, who simply discarded Kalvin Phillips, a promising young DM by all accounts, as a lost cause. He had one of the world's best tier-2 defensive midfielders - he simply couldn't turn him into a tier-1 midfielder, a failure highlighted by the transformation by Arne Slot of Ryan Gravenberch into the world's best "number 6" this season - a position Gravenberch had never played before and didn't want to play until this season.

An honest Man City fan has made an argument to me that despite all the spending, despite all the institutional advantages, despite all the alleged corruption that Guardiola has benefited from, what sets him apart is his ability to consistently produce successful teams that also catch the eye, something that other coaches have not been able to deliver even with comparable levels of financial and institutional advantages. I was told to simply marvel at the beautiful white elephant, not to get caught up in the destructive underlying economics.

Manchester City's trainwreck run following Rodri's injury, however, raises questions as to the fundamental fragility of this white elephant, however beautiful and expensive it may be. If, even with essentially unlimited spending, (allegedly) fraudulent sponsorships, a manager who has won every trophy imaginable, and a squad that has literally won the last four league titles in a row, Guardiola's team goes down like a house of cards when one player - just ONE PLAYER - gets injured, that is hardly the mark of resilience. Of sustainability.

For reference, by the way, in the 2020-21 season, all three of Liverpool's senior central defenders had gotten injured by November, and for a while, Jürgen Klopp adjusted by playing two of his three first-choice midfielders as the two center-backs, essentially depriving him of FOUR first-choice players in their best positions. The midfielders were eventually restored to their preferred positions, but both center-back positions remained occupied by untested, unproven youth players for the rest of the season. Liverpool still ended up finishing third in the table that season. Man City, as things stand, are sixth.

Rodri's injury has exposed Guardiola's cluelessness in the face of actual adversity for the first time for the whole world to see. This is not a tortured genius against whom the gods conspire out of jealousy. This is not a master tactician who already knows how to solve problems before they arise. This is a one-trick pony whose one trick has, for the first time ever, been rendered null and void.

Monday, October 14, 2024

आधुनिक स्त्रीवाद, अर्थात Feminism, वर थोडेसे


भगवद्गीता अध्याय १, श्लोक ४०-४१

अर्जुन उवाच -
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः,
धर्मे नष्टे कुलम् कृत्स्नम् अधर्माभिभवत्युत ।।
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः,
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ।।

(कुलक्षय झाला तर कुलधर्म बुडीस जातो. कुलधर्म बुडाला तर तशीच पोकळी राहत नाही. त्याच्या जागी अधर्म फोफावतो. मोठं झाड कोसळून पडलं तर ती जागा तशीच मोकळी राहत नाही. तिथे बुरशी, बांडगुळे, आणि कृमी-कीटक वाढीस लागतात. अधर्म फोफावला की स्त्रियांची वागणूक बिघडते (प्रदूषित होते). बिघडलेल्या स्त्रिया वर्णसंकर, म्हणजे समष्टीच्या विनाशाला कारणीभूत होतात.)

अर्जुनाने आपल्याला ७,५०० वर्षांपूर्वीच ही चेतावणी देऊन ठेवलेली आहे.

आपला कुरुवंशासारखा कुलक्षय झाला नसला, तरी कुलाभिमान बाळगणे म्हणजे काय, हे आपण विसरून गेलो. कुलधर्म म्हणजे काय, त्याचे उद्दिष्ट काय, हेच आपण विसरून गेलो. 

प्रामाण्यबुद्धिः वेदेषु
साधनानाम् अनेकता ।
उपास्यानाम् अनियमः
एतद्धर्मस्य लक्षणम् ॥

यामधील मधल्या दोन ओळी तेवढ्या आपण ठेवल्या. वेदप्रमाण बुद्धीकडे दुर्लक्ष केलं, आणि ही सर्व ज्याची लक्षणे त्या धर्माकडे दुर्लक्ष केलं. प्रमाण आणि उद्दिष्ट बाजूला ठेवलं, तर नुसतं "साधनानाम् अनेकता" आणि "उपास्यानाम् अनियमः" उपयोगी नाहीच, उलट घातक आहे. पैसा, सत्ता उपास्य दैवत नाही, आणि खोटेपणा, अनीती साधन नाही, हे वेदप्रमाण बुद्धी आणि आत्मज्ञानाच्या उद्दिष्टाशिवाय कसं पटणार?

कुळाचार, कुलधर्म हे साधन होते, साध्य नव्हे, हे आपण विसरून बसलो. 

आपण अहंकार घालवायला नव्हे, तर अंगभूत अहंकार कुरवाळायला कुळधर्म वापरायला लागलो. याने कुलधर्म, कुळाचार लोप पावले. अधर्म उभारी घेऊन वर आला.

पुरुषी अभिमान कशावर आधारलेला असावा हे माहिती नसणाऱ्या (किंवा विसरलेल्या) पुरूषांविरुद्ध स्त्रैण अभिमान कशावर आधारलेला असावा हे माहिती नसणाऱ्या स्त्रियांची फळी तयार झाली. रामाने प्रश्नही न विचारता ज्यांची आज्ञा ऐकावी असे दशरथही नाहीसे झाले, आणि कर्तव्यनिष्ठ रामही. मग रावण, शूर्पणखा, आणि त्राटिकेला आवरणार कोण?

पुरुषी अहंकाराच्या अतिरेकाला प्रत्युत्तर म्हणून "स्त्रीवाद" ही चळवळ अस्तित्त्वात आली हे खरे असेलही, पण स्त्रीवाद जर स्त्रियांच्या अहंकारालाच पाठबळ देणार असेल, तर त्याला अर्थ काय? तुम्हाला उघडपणे "अहंकारवादी" म्हणून जगासमोर यायची लाज वाटते, एवढाच त्याचा अर्थ. एका अर्थानी तेही बरंच आहे म्हणा, पण नाव बदललं म्हणून स्वभाव थोडीच बदलतो?

हल्लीचे "स्त्रीवादी" कदाचित ऋषींच्या यज्ञांत विघ्न आणणाऱ्या त्राटिकेला मारलं, म्हणून रामाला misogynistic abuser ठरवतील, आणि लंकेला जाताना हनुमानाला अडवणाऱ्या सिंहिकेला "feminist icon" म्हणून गौरवतील, कोण जाणे?

दुर्योधनाला त्याच्या आंधळ्या बापावरून टोमणे मारणाऱ्या, आणि मग स्वतःचे शब्द अंगाशी आल्यावर केविलवाणेपणाचं, हतबलतेचं सोंग पांघरणाऱ्या द्रौपदीला या पढतमूर्खांनी "feminist icon" केलंच आहे. मग "स्वतंत्र बुद्धीने" विवाहित रामावर लाईन मारणाऱ्या, आणि राम बधत नाही पाहिल्यावर लक्ष्मणावर डाव टाकणाऱ्या शूर्पणखेलाही या पंक्तीत बसवायला काय हरकत आहे? तिला "strong independent freethinking woman who society couldn't lock up" म्हणायला काय हरकत आहे?

आजच्या भाषेत सांगायचं झालं, तर रामायणातही शूर्पणखेचा "ठरकीपणा" पाठीशी घालणारा एक पुरुष होताच की. त्याचं नाव रावण.

एकवचनी राम, आणि "दशमुख", म्हणजेच दहा ठिकाणी दहा वेगळ्या गोष्टी बोलणारा रावण.
स्वप्रेरणेने रामाचं संरक्षण करण्यासाठी वनवास सहन करणारा लक्ष्मण, रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य करणारा भरत, सख्खा भाऊ धर्म सोडून वागतोय पाहिल्यावर त्याला सोडून "शत्रुपक्षात" सामील होणारा बिभीषण, रावणाची चूक त्याच्या ध्यानी आणून देणारा पण भावाची बाजू न सोडणारा कुंभकर्ण.
रामाला खराब बोरं मिळू नयेेत म्हणून प्रत्येक बोर चाखून पाहणारी शबरी, आणि कैकेयीच्या स्वार्थाला फूस देणारी मंथरा. 
रावणाच्या मायावी भुलावणीला न भुलणारी सीता, आणि रामाला मिळवायला मायावी प्रयोग करणारी शूर्पणखा.
नवऱ्याकडून स्वार्थासाठी वर मागून घेणारी कैकेयी, आणि व्यभिचारी नवऱ्याला सतत सरळ मार्गानी चालायचा उपदेश करणारी मंदोदरी.

मनुष्यस्वभावाची किती वर्णने!
मनुष्यस्वभावाचा किती सखोल अभ्यास!
चांगलं वागणं म्हणजे काय, वाईट वागणं म्हणजे काय, यावर किती सूक्ष्म चिंतन!

पण रावणाची लंका सोन्याची, आणि रामाच्या नशिबात वनवास, हे ऐकूनच ज्यांची मने कलुषित होतात, त्यांना हे कुठलं कळायचं.
प्रतिगामी, oppressive, sexist, misogynist म्हणून लेबलं चिकटवली की झालं, आता या फसव्या लेबलांच्या आडून पुरुषोत्तम रामावर वार करायला हे मोकळे.

आपले "धर्मग्रंथ" लिहिणारे द्रष्टे मूर्ख नव्हते. प्रतिगामी नव्हते. स्त्री-द्वेष्टे तर मुळीच नव्हते. ते तसे होते असं आपल्याला का वाटतं, हा आपण आपल्याला विचारायचा प्रश्न आहे.

पाश्चात्त्य देशांत जे ख्रिस्ताचे झाले आहे, तेच आपल्याकडे रामाचे झाले आहे.

अहंकारी मूर्तीपूजकांना फळ टाकून देऊन साल चघळत बसायची गचाळ सवय असते. स्वतः साल चघळून हे लोक थांबत नाहीत, तर इतरांनाही फळ सोडून साल चघळायला लावतात. मग ती मूर्ती ख्रिस्ताची असो, रामाची असो, नाहीतर अजून कशाची. फळ टाकून दिलं तर साल तुमच्या स्वतःच्या तरी पचनी कशी पडणार? 

फळ काय हे माहितीच नसल्यामुळे, फळाचा आनंद घेणारे कुठेच न दिसल्यामुळे, साल चघळत बसणे हा कसला धर्म, हे कसले कुळाचार, ही कसली परंपरा, हे प्रश्न पुढच्या पिढीमध्ये स्वाभाविकपणे येतात. हा आगाऊपणा नव्हे, तर अत्यंत सयुक्तिक विचार आहेत. 

अहंकारी मूर्तीभंजकांच्या हातात यामुळे आयतेच कोलीत पडते. "आपला शत्रू जर चुका करत असेल तर त्याच्या आड येऊ नये" या न्यायाने, फळाशिवायची साल कशी निरूपयोगी, कशी प्रतिगामी, कशी घातक, हे पुरेपूर ठसवायला मूर्तीभंजक टपलेलेच असतात.

सोप्या शब्दात सांगायचं, तर श्रेष्ठांचे अनुकरण करणे हे धर्माचे रसाळ, तरतरीत, सत्त्वगुणी फळ आहे, त्यांचे पूजन करणे नाही.

पूजनाचा दिखावा करणे सोपे असते. अनुकरण करणे अवघड. भक्तीचा दिखावा करणे सोपे असते. भक्ती करणे महाअवघड.

अनुकरणजनक आदर गंड नष्ट करतो आणि भक्ताला भगवंत बनवतो. भेदजनक पूजन भक्ताला भगवंतापासून कायम दूर ठेवते आणि न्यूनगंड निर्माण करते. न्यूनगंड निर्माण करणे हे "पूजन" या संस्थेचे उद्दिष्टच आहे. 

अनुकरण हे खऱ्या अर्थाने उत्तमाचे पूजन.

आपण अनुकरण उत्तमाचे न करता "उत्तानाचे" करत असू, तर तेसुद्धा पूजनच - फक्त श्रेष्ठाऐवजी कनिष्ठाचे. मांगल्याऐवजी अमंगलाचे. सत्य-शिव-सुंदरा ऐवजी असत्य, अशुभ, असुंदराचे. 

सीता व्हावेसे आजच्या स्त्रियांना वाटणार नाही, हे मी समजू शकतो. पण म्हणून शूर्पणखा व्हायचे, ही कुठली बुद्धी? अबला व्हायचे नाही म्हणून मदांध सबला व्हायचे? हे कसले विचित्र डोहाळे? मंदोदरी व्हायचे नाही म्हणून कैकेयी व्हायचे? शबरी व्हायचे नाही म्हणून सिंहिका व्हायचे, त्राटिका व्हायचे? ही कुठली बुद्धी?

आपल्याला राम व्हायचे आहे, की रावण? वाली व्हायचे आहे, की लक्ष्मण? दुर्गा व्हायचे आहे, की शूर्पणखा? जिजाऊ व्हायचे आहे, की सोयराबाई?

हे स्वतःच स्वतःला विचारायचे प्रश्न आहेत. रावण मरत नाही. कारण रावण ही एक मनोवृत्ती आहे. त्राटिका, शूर्पणखा मरत नाहीत. कारण ती एक मनोवृत्ती आहे. मनोवृत्तीला विरोध मनोवृत्तीनेच करावा लागतो, भौतिक साधनांनी नाही. राममय मनोवृत्ती राखणे, हेच रावणाने ग्रासलेल्या, शूर्पणखेच्या मायावी मगरमिठीत सापडलेल्या मनोवृत्तीला उत्तर आहे.

जोपासावा राम | वाढवावा राम |
फुलवेलु राम | आनंदाचा ||
दशमुखे वेढले मन | ज्याने केले उच्चाटन |
त्याते दिसे निर्गुण | मूळरूप ||
पहावी सीता शांती | लक्ष्मण वैराग्यमूर्ती |
पुढे नतमस्तक मारुती | भीमरूपी ||
ऐशी रघुनंदनाची ख्याती | निर्गुणाची सगुण मूर्ती |
निष्ठुर मन पालटी | खेळीमेळी ||
रामरूपे भरले मन | तेचि पूर्ण ब्रह्मज्ञान |
एक तेचि उत्तम साधन | दास म्हणे ||

- तन्मय

Tuesday, August 27, 2024

Impact of Social Media on Society in the Last Decade

I got this subject as a writing assignment for a "job application" that petered out so quickly that I now think this was just a client requirement that they got written from me free of cost. 

Nevertheless, it is written with as much dedication as any other piece I would have written on my own. I might even expand this piece later.

--------End of prologue now enjoy content--------


Impact of Social Media on Society in the Last Decade

The world of social media as we know it came into being in the early 2000s, with MySpace and Orkut being among the early movers. Although the history of social media as a concept can be traced back to the earliest online message boards in the late 1970s, these prototypes would be unrecognizable to the average Facebook or Instagram user today, and would be considered redundant relics of a bygone era, which, in a very real sense, they are.

By 2010, social media had really come into its own, with the launch of Facebook in 2004, YouTube and Reddit in 2005, Twitter in 2006, Tumblr in 2007, and Instagram in 2010 upending the first movers in the field and establishing a dynamic force that has had a mixed but defining impact on society in the years since.

The impact of social media on society in the last decade can be readily broken down into six aspects:

o   Personal Connections

o   Commercial Opportunities

o   Audience Access

o   Legal Impact

o   Unethical Content

o   Political Polarization

1.      Personal Connections

The most obvious impact of social media has been the ease with which people from across the globe can now connect and converse. From finding and connecting with lost friends from high school, to arguing with complete strangers about sports, movies, music, and culture in general, to helping out in natural disasters and other emergency situations, to finding potential romantic partners, social media quite literally presents the world at the user’s fingertips. With many personal connections being disrupted due to the need to travel for professional or educational pursuits, people can now effectively stay in touch with the multifaceted connectivity offered by social media. Online interactions can also lead to new connections and friendships for people who may be starved for a sense of community in the real world but find comfort in the embrace of friendly strangers on the internet.

Many government organizations around the world are also effectively making use of social media to establish direct contact with their citizens, enabling crisis resolution in real time. Of course, private corporations have also got in on the act, establishing a hitherto unimaginable direct connectivity with individual end consumers through social media such as Facebook, Twitter, Instagram, or YouTube.

2.      Commercial Opportunities

This directly feeds into the second aspect of how social media has impacted society over the last decade, with direct contact with end consumers opening up extremely lucrative marketing opportunities for manufacturers and retailers. The social media boom has truly opened up the field of B2C marketing, freeing it from the necessity of physical connections in the form of telephonic conversations, dealership visits, or house to house salesmanship. With no need for a physical connection, sellers can now stay in touch with buyers anytime, anywhere, allowing companies to interact with customers in real time.

The extensive, multifaceted user data generated on social media platforms means that advertisers can obtain extremely precise data points about their consumers, including their likes and dislikes, behaviors and lifestyles, frequency and timing of internet usage, social connections, and more. This can, when used intelligently, be used to create personalized advertising that generates more leads than any other marketing strategy. The heavy use of social media by end users reinforces the potential of this marketing strategy, with almost all consumer demographics maintaining a notable presence on social media platforms these days.

3.      Easy Audience Access for Creatives

Social media platforms present a readily accessible audience for creatives of every description.

Platforms such as Instagram, Facebook, Twitter, and YouTube are accessible globally, allowing creators from every part of the world to share their craft to a global audience. Whether they succeed in generating a livelihood from these pursuits depends on their popularity, but it presents a promising landscape for creators who may not have access to traditional means of reaching an audience.

YouTubers like MrBeast and PewDiePie have become global phenomena over the last decade using pretty much nothing but a video camera, a sound setup, and some video editing software. Comedians, talk show hosts, and podcasters can garner immense popularity and hype from promotion on social media, without having to rely on corrupt industry insiders, promoters, or agents. Budding musicians can use social media to gain an adoring audience even before holding a single live show, while practitioners of often-ignored arts and crafts such as origami, mime, or stage magic can form global communities joined by nothing more than a shared love of that particular activity.

4.      Legal Impact

While direct access to consumers on social media has been profitable for commercial organizations, the sheer scale of user data generation and lack of concrete assurance about its security and ethical usage have raised eyebrows. Many government bodies have taken social media platforms such as Facebook and Twitter to court, aiming to bolster data protection for its own citizens against malicious third parties who may purchase or hack into the user data storage of social media platforms and use this data for a whole host of illegal, unethical, and unwholesome applications, ranging from identity theft to blackmail to cyber-attacks on government apparatus.

On the other hand, several governments have gotten into legal battles with social media platforms over the claimed right of government bodies to legally acquire user data from social media platforms in the name of national security, even against the wishes of the individual users. The confidentiality of user data, including critical information such as the user’s real-world identity, is a key selling point for most social media platforms, and such actions have raised concerns about the possibility of totalitarian behavior from governments, who could abuse user data from social media platforms to harass or even arrest dissidents, suppressing free speech.

The need to protect individuals’ free speech while simultaneously protecting national and international security remains a key concern for the world of social media, with universal, sustainable, feasible solutions yet to be found.

5.      Unethical Content

The democratization of interpersonal connectivity brought about by social media has been a double-edged sword, with the utter lack of discrimination in bringing people closer sometimes leading to deeply unhealthy associations. Terrorist organizations frequently use the data encryption and protection features offered by social media platforms to recruit new members and plan and organize their activities. Pedophiles and other types of sexual predators have been able to get close to young or even underage social media users of both genders, while sales of illegal substances are also frequently carried out over encrypted social media platforms due to the anonymity they offer. Such trends pose a serious threat to societal stability and even national security.

Other than such flagrant violations of the law or societal ethics, more insidious evils have also sprung up due to the overuse of social media, particularly by vulnerable populations such as children, teenagers, and young women. Filters and other image editing tools allow influencers to post unrealistically attractive or fake photos and videos on their highly popular social media channels, which can influence young, impressionable users into making permanent changes to their body or trying unhealthy diets that lead to long-term damage, including bulimia and other eating disorders. Dysmorphia, eating disorders, and psychological conditions have been on a constant rise over the last decade, fueled at least in part by the easy access to the unethical content shared by social media influencers.

In addition, social media can be highly addictive due to their use of the ‘infinite scroll’ technology. This can lead to unproductive lifestyles and unchecked time wastage, particularly among younger users. User anonymity on social media is also conducive to fraudulent activity such as financial scams or honey traps leading to blackmail, with the rising volume of “online scams” presenting a novel quandary for law enforcement agencies all over the world.

6.      Political Polarization

Rampant political polarization may be the most far-reaching, notorious, insidious, and unwholesome impact of social media on national and global society over the last decade.

To make themselves irresistible to the broadest possible range of users, most social media platforms utilize algorithms to present viewers with new content that is similar to or related to content they have previously watched. This allows the social media platform to diversify its user base while simultaneously ensuring recurring activity from all of its users.

This, allied to the excessive usage of social media platforms by users, has led to rampant escalation of the “echo chamber” phenomenon across the world, with collective agreement on every talking point becoming more valuable for voters than the civic duty to disagree respectfully and to have an open debate taking in all perspectives.

This has led to rising polarization among the voting masses in democracies around the world, with free access to global knowledge and diverse perspectives leading not to more homogeneity and social stability but instead to an escalation in heterogeneity and discord. Since social media users are only exposed to their own echo chamber, they get increasingly entrenched in their own worldview and become less likely to even acknowledge the other side’s views, let alone being open to accepting them as the truth. 

The ability to change one’s mind, which is absolutely essential in civil discourse, has become a lost art. Even within their echo chambers, people who simply change their opinions after some thought are often shamed as “traitors to the cause” by their in-group, which leads to silent suppression, with people censoring themselves rather than having to face the wrath of the mob. While this may be beneficial for individual political parties in the short term, it has turned into a severe threat to national unity all over the world.


Social media, once hailed as the great liberator of the individual over the group, seems to be stuck in a rut of furthering groupthink rather than allowing individuals to think for themselves and express their own opinions without being affiliated to any particular group or ideology. Social media, once hailed as an essential aid in individual citizens being able to freely discuss political ideas, is now stuck in a legal battleground over its role in enabling free speech. Social media, once hailed as the great global online melting pot, now has to make sure that the stew it is serving up is healthy and wholesome rather than corrosive and poisonous.

Like it or not, social media platforms are very much here to stay. They are deeply ingrained into the societal fabric and have become essential to the daily lives of millions of end users all over the world. Solutions – which may range from voluntary moderation to legal restrictions and everything in between – need to be found to the dark side of social media, so that their bright side can keep regaling us for a long time to come.

Friday, July 19, 2024

काही आधुनिक उखाणे


वैधानिक चेतावणी: पुढील उखाण्यांमध्ये "xxx" हे शिवी म्हणून नव्हे, तर नवर्याच्या नावाच्या जागी वापरले आहे. आत्ताच्या बायकांना कदाचित कळणार नाही, म्हणून आधीच खुलासा करून ठेवतो आहे. आयत्या वेळी तुम्ही नवर्याच्या नावाच्या जागी सवयीची शिवी घातली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. 


नातेवाईक जमले सारे
तोंड झालं गोड,
लग्न करतोय आपण xxx,
आता तरी तिचा नाद सोड!!

(त्याने तिचा नाद सोडल्याची खात्री असेल तरच हा उखाणा म्हणावा. भर लग्नातून उठून नवरा दुसरीबरोबर पळून गेला तर आम्हाला जबाबदार ठरवू नये.)


xxx साठी सोडलं घर,
आणि सोडला गाव,
नेहमी शिवीनेच हाक मारते,
आजच घेतेय नाव ||


रेडिमेड घातली नऊवारी,
कष्टाने सांभाळत्ये पदर,
xxx ची मात्र शेवटपर्यंत
मनापासून ठेवेन कदर ||

(हा उखाणा म्हटला तर शेवटपर्यंत कदर खरंच ठेवावी, फक्त तोंडदेखलं म्हणून मोकळं होऊ नये)


देखणा दिसतोय xxx
थोरामोठ्यांची गर्दी दाटली
Situationship वाटली होती,
इथे मुहूर्ताची वेळ येऊन ठाकली ||

(हा उखाणा तो देखणा दिसत नसला तरीही म्हणावा, थोरामोठ्यांवर चांगलं impression पडतं)


"लग्न? Eww!" करता करता
"इश्श" पर्यंत आले,
शेवटी उरले xxx राव,
बाकी सगळ्यांचे काटले ||

(काटले गेलेले बाकीचे सगळे लग्नाला आले असतील तर आवर्जून हा उखाणा म्हणावा)


College साठी आले होते,
नोकरीसाठी राहिले,
पण xxx शी लग्न केल्यावरच,
हे गाव मला "माझे" वाटले ||

(सगळेच आधुनिक उखाणे विनोदी असावेत असे नाही. कवीला माणुसकीच नाही असे कुणीही म्हणू नये.)

हे उखाणे कुणीही हवे तसे वापरायला आमची काहीच हरकत नाही. परंतु उखाणा वापरला तर कृपया तो स्वतःचा म्हणूनच मिरवावा. मोठे नातेवाईक रागावले तर सोयीस्करपणे आमच्या डोक्यावर खापर फोडू नये. 

यामध्ये पुरुषांसाठीचे उखाणे नाहीत, फक्त बायकांसाठीचे उखाणे आहेत, हे चाणाक्ष लोकांच्या ध्यानात आले असेल. याचं कारण sexism किंवा misogyny हे नसून, पुरुषांनी उखाणे घेणे, किंवा "नाव घेणे", हा अत्यंत मूर्खपणाचा प्रकार आहे, असे आमचे प्रामाणिक मत आहे. 

पूर्वीच्या काळी पत्नीला पतीचे नाव घ्यायची मनाई होती, पण पतीला पत्नीचे नाव घ्यायची मनाई नव्हती. म्हणून बायकोने नवर्याचे "नाव घेण्याला" त्या काळी अर्थ होता. आता बायका पुरुषांना नावानेच हाक मारायला लागल्यानंतर मुद्दाम "नाव घेण्याला" काहीच अर्थ उरलेला नाही. 

तरी बायका - अगदी फेमिनिष्टातल्या फेमिनिष्ट बायका सुद्धा हो - "मजा वाटते" म्हणून उखाणे घेत असतात. नवर्यासाठी बायकोने स्वयंपाक करणे, नवर्याचे कपडे बायकोने आवरून ठेवणे, हे आम्हाला कमीपणाचे वाटते, हे ठणकावून सांगणार्या या साळकाया-माळकायांना नाव घेण्याच्या बाबतीत मात्र ही जुनी, बुरसटलेली पद्धत कशी सांभाळावीशी वाटते, हा एक खरोखर विचार करण्याजोगा प्रश्न आहे. 

नाव घेण्यामागची कारणमीमांसा ज्यांना लक्षात आली आहे, त्यांना पुरुषांनी नाव घेण्याला काहीच अर्थ नाही हे लक्षात आले असेल. पण पुरुषी वर्चस्वावर आधारलेली "नाव घेण्याची" संस्था सोडून देण्याऐवजी बायका आपणहून त्यात हिरिरीने भाग घेतात, स्वतः त्यातून बाहेर पडण्याऐवजी पुरुषांनाही त्यात ओढून घेतात, आणि पुरूषही काही विचार न करता, "बायकोला बरं वाटावं म्हणून", किंवा "समतेच्या" नावाखाली या मूर्खपणामध्ये सहभागी होतात, यामध्ये आधुनिक फेमिनिझ्म चे खूप मोठे सूत्र दडलेले आहे. असो. विचार करणार्यांना रान मोकळे आहे. नाहीतर काय, सरड्याची धाव कुंपणापर्यंत.


- तन्मय विराज टिकेकर 
१८ जुलै २०२४

Tuesday, June 11, 2024

नृसिंह स्तोत्र: चेतनेची उपासना व सचेतनातील अभेद

 मना सज्जना भक्तिपंथेचि जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे

भक्तीची मजा अशी आहे, की एका उपास्य दैवताला खोलात खोल, सूक्ष्मात सूक्ष्म रूपांत भेटत गेलात, की कुठल्याही दैवताला तशीच गळामिठी मारता येते. भूगर्भातल्या एखाद्या प्रचंड जलाशयाला जसं कुठेही खोदलं तरी तेच पाणी लागतं, तसं कुठल्याही दैवताची उपासना आपल्याला त्याच भक्तीच्या जलाशयात घेऊन जातेमात्र भक्तीची मेख अशी आहे, की हे पाणी लागायला 'खुद' मध्ये तेवढी 'खुदाई' करायची तयारी हवी. फक्त वरवरचे पापुद्रे सोलले, तर कुठेही खोदलं, आणि कितीही ठिकाणी खोदलं, तरी काही उपयोग नाही.

माझी हिंदूधर्माची पहिली ओळख मारुतीपासून झाली. लहानपणी झोपताना आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींतून हनुमान भेटला, आणि आयुष्यभराचा friend-philosopher-guide मिळाल्यासारखं वाटलं, ते आजतागायत तसंच वाटतं.

हिंदूधर्माच्या मूलतत्त्वांची ओळख करून घ्यायला हनुमानासारखा दुसरा मार्गदर्शक नाही. मारुतीच्या उपासनेतूनच मला राम भेटला, शंकर भेटला, वराह-नरसिंहाची जोडगोळी भेटली. रामाच्या भेटीतून नवदुर्गांची ओळख झाली. शंकरावर विचार करता करता स्कंद म्हणजेच कार्तिकेयाशी ओळख झाली, सती-पार्वती-दक्षाची भेट झाली, गणपतीची गणेशोत्सवात झाली होती त्यापेक्षा खूप जास्त ओळख झाली. तिथून पुढे इंद्र-वरुण-अग्नी-वायू . वैदिक देवांची ओळख झाली, त्यातून अदिती-कश्यप भेटले, पंचमहाभूते भेटली.

या सगळ्या प्रवासात मारुती पाठिराखा म्हणून कायम सोबत होता. गडा-झाडांवर उड्या मारणारा, जोरात भुभु:कार करून ऋषीमुनी दैत्य-दानव दोघांनाही पिडणारा, "हुप् कार करोनी आकाशात उडणारा", चंचल तरीही स्थितप्रज्ञ, असा हा देव माझ्या मनात अगदी पहिल्यापासून घर करून राहिला आहे

हल्लीच्या जगात ADHD चं निदान करण्यात आलेल्या सर्व मुला-मुलींना 'औषधे' देऊन गपगार करण्यापेक्षा त्यांची हनुमानाशी ओळख करून दिली तर सर्वांचंच बरं होईल, असं माझं प्रामाणिक मत आहे. मला खात्री आहे, की मी लहान असताना जर हे ADHD चं भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं असतं, तर मला नक्कीच ADHD चा 'रुग्ण' समजून त्यावर 'उपचार' केले गेले असते. त्याऐवजी मला हनुमान भेटला, हे माझं सौभाग्य.


सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे

हनुमानाच्या चळवळेपणामागे खूप मोठा अर्थ आहे. एका जागी शांत बसून राहता येणं, हा गुण आहेच. पण म्हणजे कायम सगळ्यांनी शांतच बसून राहिलं पाहिजे, ही अपेक्षा धरणं मूर्खपणाचं आहे

अशा वृत्तीतून फोफावते, ती नम्रता नव्हे, तर अहंकार. शिकवण्यात रस नसलेल्या शिक्षकांना, मुलांचं संगोपन करण्यात रस नसलेल्या पालकांना, आणि सृजनशीलतेत रस नसलेल्या कारखानदारांना सुरळीत, एका रेषेत चालणारे गुलाम मिळावेत, यासाठी केलेली ही गलिच्छ धडपड आहे

ज्यांना शांत बसायचंय त्यांनी जरूर बसावं - "शांताकारं" हे तर विष्णुचं प्रमुख नाव आहे - पण शांत बसणे ही चळवळीचीच सुफळ संपूर्ण अवस्था आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे

चळवळ होत असताना ती जबरदस्तीने गप्प करणं, हे कुणी शांत बसलेला असताना त्याला धक्के मारून उठवण्याइतकंच त्रासदायी. कच्ची फळं तोडायला कष्ट घ्यावे लागतात. पिकलेली फळं मात्र अलगदपणे हातात येतात. तसंच, अंगभूत चळवळ पूर्णत्वाला गेली तरच लहानपणीच्या स्वैर, कुणाला जुमानणाऱ्या नारायण सूर्याजीपंत ठोसराचा मोठेपणी समर्थ रामदास होतो. शांत बसणं म्हणजे चळवळ जबरदस्तीने बंद करणं, ही समजूत अत्यंत घातक चुकीची आहे. जॉर्ज ऑर्वेल च्या "1984" या प्रसिद्ध दु:स्थापनदर्शी (dystopian) कादंबरीचा हाच तर गाभा आहे.

 

कदा तो जनी पाहतांही दिसेना, सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना

चळवळ जीवंतपणा दर्शवते. इंग्रजी भाषेतला animal हा अतिपरिचयादवज्ञा झालेला शब्द खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. या शब्दामधलं 'anim' हे मूलरूप animism  animated या शब्दांतही दिसतं. हिंदू तत्वज्ञानात सचेतन आणि अचेतन या ज्या अत्यंत महत्त्वाच्या संज्ञा आहेत, त्यातली 'चेतना' हाच animal मधल्या 'anim' या मूलरूपाचा अर्थ

पाश्चात्यांचा "anim" म्हणजेच हिंदूंची "चेतना". जे सचेतन आहे, ते "animated" आहे. स्वयंप्रेरणेने, सचेतनपणे वागणारे, ते "animal".

ज्या पुरातन ग्रीक आणि संस्कृत भाषेतील साधर्म्यामुळे "proto-indo-european" भाषेचा अभूतपूर्व शोध लागला, ते साधर्म्य या दोन संस्कृतींच्या धार्मिक पद्धतीतही आहे

ग्रीकांचं pantheon (देवगण) आणि वैदिक हिंदू देव-देवतांमध्ये कमालीचं साधर्म्य आढळतं, कारण या दोन्ही संस्कृती proto-indo-european संस्कृतीपासूनच उत्क्रांत झाल्या, आणि animism वर आधारित, म्हणजेच चेतनेपुढे नतमस्तक होणाऱ्या होत्या

ग्रीकांचा जसा झ्यूस आहे, तसाच आपला इंद्र आहे. त्यांचा जसा औरानोस (युरेनस) आहे, तसाच आपला वरूण आहे. त्यांची जशी गाएया, तशीच आपली भूदेवी. त्यांच्या पर्सियस, हेराक्लिस, थीसीयस, अकीलीस या "heroes" सारखेच आपले राम, कृष्ण, वामन, परशुराम हे "अवतारआहेत. स्थलकालपरत्वे या दोन धर्मांत फरक पडले आहेत, पण मुळातली जगाकडे पाहण्याची दृष्टी एकच.

आजच्या काळात पाश्चात्त्य जगात "animism" हा शब्द बहुतेक वेळा हेटाळणीच्या सुरातच बोलला जातो, कारण आधुनिक विज्ञानात, दिसणाऱ्या, मोजमाप करता येणाऱ्या चेतनेला स्थान नाही, त्यामुळे त्यावर आधारित संस्कृती परंपरेलाही तिथे स्थान नाही. हिंदुस्थानात सचेतन-अचेतन या संकल्पनांचं महत्त्व अजूनही टिकून आहे, पण पाश्चांत्त्यांचं अनुकरण करण्याच्या आपल्या (जबरदस्तीने लादल्या गेलेल्या) सवयीमुळे त्याचाही ऱ्हास होत चालला आहे.


तया निर्विकल्पासि कल्पीत जावे, परि संग सोडूनि सूखे रहावे

या चेतनेचं हिंदू नाव म्हणजेच विष्णूनाभिकमलात ब्रह्मदेवाला धारण केलेला, महादेव शंकरानेही वंदन केलेला हा परमात्मा सर्व प्राणीमात्रांचे मूळ आहे

चेतनाधारित (animist) संस्कृतींचं वैशिष्ट्य हेच, की त्यांनी निरपेक्ष (objective) ज्ञानामागे लागता सारं जग संपूर्णत: सापेक्ष (subjective) मानवी दृष्टिकोनातून पाहिलं, हा 'संपूर्ण मानवी दृष्टिकोन' आहे तरी काय, हे शोधण्यावर भर दिलावरूण, इंद्र, अग्नि . निसर्गदैवतांचं तत्त्व आपण मानवी रूपकांतून उलगडलं. विष्णू, शंकर . सर्वव्यापक तत्वांना "नेति नेति" म्हणतानाही मानवी मनाला कळतील वळतील अशा नामरूपांनी संबोधलंनिरपेक्ष ज्ञान जर असलंच तरीही ते आपल्याला दिसणार मानवतेच्या चष्म्यातूनच, हे पक्कं ओळखून आपण मानवी संवेदना उंचावण्यावर भर दिला. सापेक्ष ज्ञानाची परिणतीच निरपेक्ष ज्ञानात होते, हा अनुभव घेतलेल्यांनी आपल्या वागण्यातूनच इतरांना ही वाट चोखाळायला उद्युक्त केलं. कुणालाही याची जबरदस्ती करावी लागली नाही.

आपली पुराणे देवांचं, म्हणजेच निसर्गतत्वांचं मानवीकरण करून गोष्टी सांगतात, कारण निरपेक्ष ज्ञान कमावण्यापेक्षा माणसाची वागणूक कशी सुधारता येईल, समाज बलवत्तर कसा ठेवता येईल, चांगलं आयुष्य कसं जगायचं हे सामान्यजनांना कसं सांगता येईल, यावर आपण भर दिला. सृष्टीची कोडी उलगडण्याऐवजी आपण 'स्व' ची कोडी उलगडण्यावर भर दिला. 'स्व' मध्ये सृष्टीसुद्धा येतेच, हा चेतनाधारित विचारधारांचा अतिशय महत्त्वाचा शोध आहे. 

याच्या उलट, चेतनेचं अस्तित्वच अमान्य करणारे पाश्चात्त्य विज्ञान षड्रिपूंच्या आहारी गेले. निरपेक्ष ज्ञानाच्या मागे पळताना हा पळणारा "मी" आहे तरी कोण, याचा शोध बाजूला राहिला. त्यांना हवं होतं निरपेक्ष ज्ञान, कारण सापेक्ष ज्ञानाचा गैरवापर करून हुकूमशाही चालवणाऱ्या धर्मसत्तांची (theocracy) त्यांना सवय होती. त्यामुळे चर्मेंद्रियांद्वारे आणि बुद्धिखलाद्वारे मिळणाऱ्या "निरपेक्ष" ज्ञानाला त्यांनी प्राधान्य देणं अगदी स्वाभाविक होतं

"मी" ला मूलभूत मानूनच पाश्चात्त्य विज्ञान अजूनही सृष्टीची कोडी उलगडायला पाहतं. Consciousness च्या पायरीवर आधुनिक विज्ञान गेली शंभरहून अधिक वर्षे अडकून राहिलेले आहे, पण त्या consciousness चे गोडवे आपल्या वेदांनी हजारो वर्षांपूर्वीच गायलेले आहेत

"मी" आणि "माझ्याभोवतीची सृष्टी" यांमध्ये स्पष्ट भेद केल्यामुळेपाश्चात्त्यांचा सगळा कारभार चालतो सत्तेच्या, "मी" ची सत्ता "माझ्याभोवतीच्या सृष्टीवर" प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातूनयाउलट, हा "मी" स्वार्थी आहे हे जाणून "स्व"चा शोध घेणारी चेतनाधारित हिंदू विचारसरणी सकल प्राणीमात्रांतच नाही तर सकल चराचरात केशवालाच पाहते. गाईला आपण आई मानतो, वानर हनुमानाचे साथीदार म्हणून त्यांच्या मर्कटलीला खपवून घेतो. इतकंच नव्हे तर कधीकधी आपल्याच माणसांचा जीव घेणाऱ्या वाघ-सिंहांनाही आपण देवतांची वाहनं म्हणून गौरवलं, आणि अस्वलांना जांबुवंताच्या रूपात राम आणि कृष्ण दोघांच्याही आयुष्यात गोवलं.


सदा सर्वदा देव सन्नीध आहे, कृपाळूपणे अल्प धारीष्ट पाहे

सर्व जीवांतल्या चेतनेचा विष्णू मूलाधार असल्यामुळे अधर्मनिर्दालन करण्यासाठी विष्णूला त्या त्या परिस्थितीला साजेसं कुठलंही रूप घेता येतं. विष्णूच्या अनेक अवतारांमध्ये मत्स्य, कूर्म . पूर्णतः प्राणी असलेलेही अवतार आहेत, वराह, नृसिंह, हयग्रीव . अंशतः प्राणी अंशत‍‌: मनुष्य असलेलेही अवतार आहेत, आणि वामन, परशुराम, राम, कृष्ण असे पूर्णत: मानव असलेलेही अवतार आहेत. फक्त चार मानवी अवतार जरी पाहिलेतर त्यांच्यामध्ये तात्त्विक नसला तरी भौतिक फरक खूप आहे, कारण त्या त्या वेळच्या परिस्थितीच्या अनुसार हे अवतार घेतलेले आहेत.

विष्णूच्या पहिल्या दोन, म्हणजे मत्स्य कूर्म अवतारात धर्मसंस्थापनेचा हेतू असला, तरी कुणा असुराला वा दैत्याला मारण्याचा हेतू नाही. त्यापुढचे दोन अवतार, म्हणजेच वराह नृसिंह अवतार, हे मात्र दोन विशिष्ट असुरांना ठार करण्यासाठीच घेतलेले आहेत.

ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचं वरदान मिळत नाही, हे पाहिल्यावर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या दोन असुरबंधूंनी अमरत्वाच्या जितक्या जवळ जाता येईल तितक्या जवळ जाणारे वर मागितले. हिरण्याक्षाने मानव, पशु, देवांपासून अभय मागितले, तेव्हा विष्णूने ना पशू, ना मानव, ना देव अशा वराह अवतारात त्याचा वध केला. लहान भावाच्या मरणाने चवताळलेल्या हिरण्यकश्यपूने त्याच्याही पुढे जाऊन दिवसा वा रात्री, घरात वा घराबाहेर, जमिनीवर वा हवेत, अस्त्राने वा शस्त्राने, जिवंत अथवा मृत गोष्टींने, आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या कुठल्याही गोष्टीने मरण येणार नाही, असा वर प्राप्त करून घेतला.

अप्रत्यक्षपणे हिरण्यकश्यपूच्या अहंकारानेच आवाहन केलेल्या पशु-मानव-संकर स्वयंभू नृसिंहाने स्तंभातून जन्म घेतला, आणि संधिकाली (दिवसा नाही, रात्री नाही), स्वतःच्या मांडीवर (जमिनीवर वा हवेत नाही), घराच्या उंबरठ्यावर (घरात नाही, घराबाहेरही नाही), स्वतःच्या नखांनी (जिवंत वस्तूनेही नाही, मृत वस्तूनेही नाही, शस्त्रास्त्रानेही नाही) हिरण्यकश्यपूचा कोथळा काढला.


अनन्यास रक्षीतसे चापपाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी

अधर्माने कुठलंही रूप धारण केलं आणि कितीही शक्ती कमावली, तरी धर्माकडे त्याचं उत्तर असतं. मात्र कर्मठपणे कुठलातरी एकच पंथ पाळता, स्थलकालसुसंगत रूप घेण्याची लवचिकता अंगी बाणवायला हवी.

मारुतीच्या उपासनेमध्ये पंचमुखी मारुतीला विशेष महत्त्व आहे. या प्रतिमेतील हनुमान, नरसिंह, वराह, गरूड, आणि हयग्रीव हे पाच पशु-मानव संकर बाह्यरूपनिरपेक्ष चेतनेचेच प्रतीक आहेत. एकाच तत्त्वाची पाच उदाहरणे आहेत. हिरण्यकश्यपूसारख्या बलशाली, उन्मत्त दैत्याला लहान बाळासारखं मांडीवर घेऊन आपल्या नखांनी त्याचं पोट फाडणाऱ्या नरसिंहाबद्दल मला आधीपासून कुतूहल होतंच, पण पंचमुखी प्रतिमेमध्ये मारुतीच्या बरोबर नरसिंहाला पाहून एकदम मनात प्रकाश पडला, आणि मारुती-नरसिंहातला अभेद लक्षात येऊन नरसिंहाबद्दलची आपलेपणाची भावना आणखीनच दृढ झाली.

मनुष्य पशू यांना जगवणारी चेतना तीच आहे. फरक आहे तो फक्त देहरूपाचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या क्षमतांचा, बलाबलांचा. नरसिंहाची नखं रामाकडे नाहीत, तसेच रामाचे धनुष्यबाण मारुतीकडे नाहीत. कृष्णाचे सुदर्शनचक्र वराहाकडे नाही, तर मारुतीची लोहदंडासारखी शेपूट शंकराकडे नाही.

एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति |

मूलरूप एकच आहे, आविष्कार अनेक आहेत.

प्रत्यक्ष अवतार, आणि जिवलग सख्यासारखे सेवक, असं पंचमुखी मारुतीच्या पाचही मुखांचं विष्णूशी, म्हणजेच चेतनेशी, "anim" शी, जवळचं नातं आहे. ही चेतना जागृत ठेवण्याची, आपल्या अंतरंगातील "खुदाई" कधीही थांबवण्याची आठवण शिकवण पंचमुखी मारुती आपल्याला देतो. 

"अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम् देहमाश्रित:

प्राणापानसमायुक्तं पचाम्यन्नम् चतुर्विधं" 

(भगवद्गीता १५:१४)

हे एकदा कळलं आणि वळलं, की खुद काय, खुदा काय, कोणीच ही खुदाई अडवू शकत नाही. भगवद्गीतेचा दहावा "विभूतियोग" अध्याय हेच सांगतो. या अध्यायातील अनेक श्लोक इथे नमूद करता येतील, पण लांबण लावायला नको म्हणून मनाला आवर घालतो आहे. जिज्ञासूंनी गीतेचा दहावा अध्याय जरूर वाचावा.

याच विचारातून सुचलेलं हे नृसिंहस्तोत्र इथे post करीत आहे:

नृसिंह स्तोत्र

 

अनन्तसुखदं अमूर्तमूर्तं
द्वन्द्वातीतं भक्तरक्षकं
उत्तमोन्नतं धर्माधारं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
भीषणरूपं विश्वाधारं
करालदन्तं गूढविरूपं
अनिकेतं अमलं अविभक्तं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
मातुरंकयोर्शिशुमिव शमनं
तथा विष्णुना हिरण्यदमनं
अविनाशिं अजमाविर्भूतं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
अनरं अपशुं अनस्त्रशस्त्रं
अकालस्थानम् अमृत्युजन्मं
नखाग्रशस्त्रं दैत्यकन्दनं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
अजं स्वयंभुं अयोनिजन्मं
मदान्धदैत्त्यं हतमविरोधं
भक्तरक्षणं दुष्टमर्दनं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
विश्वविनायक रामं विरजं
अनिरुद्धं भय-तृष्णा-शमलं
अद्भुतरूपं अद्भुतदेहं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||


महद्रूप नृसिंह भगवान की जय!


- तन्मय विराज टिकेकर

११ / ०६ / २०२४

Sunday, June 02, 2024

निधर्मवाद: हिंदुत्व, धर्म, आणि अधर्म

Secularism म्हणजे काय यावर थोडासा विचार करण्याची गरज आज आलेली आहे. याला राजकीय कारणं तर आहेतच, ते नाकारण्यात काहीच अर्थ नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची सामाजिक व वैयक्तिक / मानसशास्त्रीय कारणंही आहेत. 

Secularism ची विचारधारा अस्तित्त्वात आली धर्माच्या नावाखाली स्वार्थ साधणार्या मध्यस्थांच्या विरोधात. पण म्हणून निधर्मीवाद धर्माच्याच विरुद्ध आहे असे मानण्याची काहीच गरज नाही. धर्म म्हणजे काय, हेच न कळल्याचे हे लक्षण आहे. निधर्मीवादाच्या नावाखाली राजकारण करणार्यांना मदत होते, ती प्रजेच्या धर्म, अधर्म, आणि निधर्म या बाबतीतल्या अज्ञानाची. हे अज्ञान जमेल तेवढं पुसण्याचा हा एक प्रयत्न.  

भारतात सध्या जो धर्माच्या नावाखाली अधर्माचा आणि निधर्माचा धुमाकुळ चाललाय, ती केवळ पाश्चात्त्य देशांत घडून गेलेल्या स्थित्यंतराची पुनरावृत्ती आहे. याला भारताने विरोध करायचा झाला, तर तो भारतीय पद्धतीनेच करायला हवा. हे पाश्चात्त्य पद्धतींचे काम नोहे. 

Secularism चा पाठ शिवाजी महाराजांनी ४०० वर्षांपूर्वीच आपल्याला घालून दिलेला आहे. ज्या शिवाजीने सूरत लुटताना ख्रिस्ती धर्मप्रचारकांना हातही लावला नाही, त्याच शिवाजीने त्याच धर्माच्या इंग्रजांच्या वखारी मुळापासून साफ केल्या, याचा अर्थ आजच्या "निधर्मी" लोकांना समजणार नाही. ज्या इस्लामचा गर्व बाळगणाऱ्या सुलतानांशी महाराज आयुष्यभर लढले, तोच इस्लाम पाळणाऱ्या "बाबा याकूत" नावाच्या सद्गृहस्थांचा आशीर्वाद घ्यायला महाराज गेले होते, हे आजच्या "निधर्मी" लोकांना अतर्क्य वाटेल. दाभोळ शहर इस्लामी राजवटीतून मुक्त करण्याच्या मोहिमेच्या आधी महाराज बाबा याकूत ना भेटायला गेले होते, आणि या पीराने त्यांना या मोहिमेसाठी आशीर्वादही दिला, हे ऐकून तर आजच्या निधर्म्यांची बोटंच तोंडात जातील. 

औरंगझेबापासून आदिलशाह पर्यंत सर्व मुस्लिम सुलतान जेव्हा आपल्या कारभारात मुस्लिमांना प्राधान्य देत होते, त्या काळात महाराज आपलं आरमार एका मुस्लिम सरदाराच्या हातात सोडत होते, आणि सुरतेतल्या मुस्लिम व्यापार्यांची संपत्ती लुटतानाही त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका राहणार नाही, याची (शक्यतोवर) काळजी घेत होते. 

आजच्या निधर्म्यांना महाराजांना "निधर्मी राजा" म्हणून गौरवायला आवडतं, पण महाराजांच्या या निधर्मीपणाला हिंदूधर्माची शिकवण कारणीभूत होती, हे ही लोकं सोयीस्करपणे विसरतात. 

धर्म-जात न पाहता केवळ अन्यायावर तुटून पडण्याची ही शिकवण हिंदूधर्मातूनच महाराजांना मिळाली. "ब्राह्मण" असलेल्या रावणाला धर्मसंस्थापनेसाठी जमीनदोस्त करणार्या, आणि त्याला ठार केल्यावर "वैर मरणापर्यंत असतं, त्यापुढे नाही" असे म्हणून आदराने रावणाचे अंत्यसंस्कार करण्यार्या श्रीरामाची शिकवण महाराजांना होती, म्हणूनच ते केवळ महापराक्रमी विजेता न होता "जाणता राजा" झाले, "शिवकल्याण राजा" झाले. 

श्रीरामाच्याही आधी, माणसाचा जन्म, पंथ, वा समाजातील स्थान न पाहता त्याच्या कर्मानुसार त्याची पारख करायची हिंदूधर्मात फार मोठी परंपरा आहे. प्रल्हाद दैत्यकुळात जन्माला येऊनही त्याला विष्णूने नृसिंहरूपात वाचवलं हे आपल्याला माहिती असेल, पण त्याला ज्याच्यापासून वाचवलं, तो हिरण्यकश्यपूही ब्रह्मदेवाच्या वरदानामुळेच देवांना वरताण झाला होता, हा तपशील आपण विसरतो. शिवाने वरदान दिलेल्या भस्मासुराला विष्णूने मोहिनीरूपात ठार केलं (करवलं), आणि ब्रह्मदेवानी वरदान दिलेल्या त्रिपुरासुराला शिवाने, तर महिषासुराला दुर्गेने ठार केलं. 

वरदान देणारेही हिंदू देवच, आणि वरदान मिळालेल्यांचा वध करणारेही हिंदू देवच. असं कसं?? 

याचं उत्तर अत्यंत सोपं आहे: हे सर्व असुर जेव्हा वरदान मागायला तपश्चर्या करत होते, तेव्हा देव त्यांना "असुर" म्हणून पाहतच नव्हते मुळी. तेव्हा ते होते फक्त भक्त. याचक. त्यांचं कर्म जेव्हा अन्यायाकडे झुकायला लागलं, त्यांच्या वरांचा ते जेव्हा गैरवापर करू लागले, तेव्हा त्यांना ठार मारण्याशिवाय देवांकडे पर्याय उरला नाही. प्रश्न व्यक्तीचा नव्हताच मुळी. प्रश्न होता कर्तृत्वाचा. 

फक्त दैत्य-दानव-राक्षसांचीच उदाहरणे तरी कशाला द्यायची? खुद्द देवनायक इंद्राने तरी काय कमी व्यभिचार केला? कमी अन्याय केला? इंद्र अहिल्येच्या रूपाला भुलून तिला फसवण्यासाठी गौतमाचं रूप घेऊन आला, आणि अहिल्या त्याला फसली. याबद्दल गौतमानी अहिल्येला दगड बनवलं एवढी गोष्ट आपल्याला माहिती असेल, पण गौतमानी इंद्राला त्याच्या अपराधाबद्दल केलेली शिक्षा तर त्याहून किळसवाणी व भीतीदायक आहे. जिज्ञासूंनी स्वतः शोध घेऊन ती जाणून घ्यावी. 

धर्म-जात-जन्मावर नव्हे, तर फक्त आणि फक्त कर्मावर माणसाची पारख करण्याची इतकी मोठी परंपरा असलेल्या देशाला सेक्यूलरिझ्म इतरांनी शिकवण्याची काहीच आवश्यकता नाही. 

सेक्यूलरिझ्मच्या नावाखाली आज विशिष्ट जाती-जमातींना राजकीय पाठिंबा दिला जातो हे दुर्दैव आहेच, पण खरा प्रश्न त्याहीपेक्षा खोलातला आहे. 

खरं म्हणजे "secularism" म्हणजे केवळ एक नकार आहे. आपण आयुष्य सेक्यूलरपणे व्यतीत करतो, म्हणजे काय रे बाबा? असं कुणा आधुनिक सेक्यूलराला विचारलं, तर त्याला खरं म्हणजे काहीच उत्तर देता येणार नाही. फार फार तर "कुठल्याही विशिष्ट धर्माला मी प्राधान्य देत नाही" ही पुस्तकी व्याख्या त्याला सांगता येईल, पण आपण काय करत नाही, यावर आयुष्य उभारता येत नाही. आयुष्य जे आहे त्याचा विचार करून उभं करावं लागतं, जे नाही त्याचा नाही. 

निधर्मीपणे जगणं हे liberal arts मध्ये डिग्री मिळवलेल्या वाचावीरांना वाटतं तितकं सोपं नाही. मुळात धर्म म्हणजे काहीतरी जुनाट, प्रतिगामी, त्याचा "आत्ताच्या जगाशी" काही संबंधच नाही, ही समजूतच चुकीची आहे.

फक्त चुकीची नाही, तर घातक आहे, कारण "आपण निधर्मी आहोत" या समजुतीने आपला "आत्ताच्या जगातला" खरा धर्म झाकून ठेवायला मदत होते. 

स्वार्थीपणा, ऐदीपणा, अहंकारी वृत्ती, थोडक्यात सांगायचं तर हिंदू तत्वज्ञानात वर्णन केलेल्या षड्रिपूंवर आजचा समाजधर्म आधारलेला आहे. हिंदू तत्त्वज्ञानात राम, हनुमान, शंकर इ. पौरुषत्वाचे, आणि दुर्गा, पार्वती, सीता इ. स्त्रीत्वाचे आदर्श मानले जातात. आजच्या समाजधर्मात मात्र बलोन्मत्त रावण आणि मर्यादाहीन शूर्पणखा हे पौरूषत्व आणि स्त्रीत्वाचे आदर्श झाले आहेत. 

आपल्याला हवे ते आपण घ्यावे, बाकीचं ज्याचं तो बघून घेईल, ही वृत्ती मनुष्यात आधीपासून आहेच. फरक एवढाच, की पुरातन धर्मपद्धतींनी या वृत्तीतली कुरूपता पाहून "लहानपण देगा देवा" म्हटलं, आणि या नैसर्गिक पण कुरूप प्रवृत्तींपासून दूर कसं राहता येईल, याचा विचार केला, आणि आजच्या विज्ञानाधारित "शहाण्या" मानवतेने या पूर्वजांना मूर्ख ठरवून स्वत‌:ला भौतिकतेच्या, म्हणजेच षड्रिपूंच्या हवाली केले. आपल्या पूर्वजांनी षड्रिपूंचं दमन आणि नियमन करण्यात धन्यता मानली, तर आपण इंद्रीयसुखांच्या मागे लागून स्वरूपालाच नव्हे तर स्वरूपाच्या संकल्पनेलाही विसरून बसलो. आपल्या मनात येणारे विचार, प्रकट होणाऱ्या इच्छा म्हणजेच आपण, हा गैरसमज दृढ झाल्यामुळे, या मनोमय कोषामागचा विज्ञानमयकोषही आपण विसरून बसलो, तर त्याहीमागच्या आनंदमयकोषाची तर गोष्ट दूरच राहिली. 

आपल्या इच्छा पुर्या करून घेणे, हाच जिथे धर्म, तिथे या पुरातन विचारधारांना थारा मिळणार कसा? "विज्ञान" भौतिक जगात कैद झाल्यामुळे आपल्या मनाच्या पलीकडेही काही आहे, हे म्हणणारेच वेडे ठरले. शहाणे ठरले ते मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणारे, इच्छांचा मागोवा घेण्याऐवजी इच्छांच्या मागोमाग जाणारे. 

संस्कृत भाषेने धर्माची "धारयते इति धर्म:" अशी मोठी सुंदर व्याख्या केलेली आहे. जो धरून ठेवतो, एकत्र बांधून ठेवतो, तो धर्म. ज्या सूत्राच्या आधारावर एखादी गोष्ट उभी असते, तो त्याचा धर्म. एखाद्या गोष्टीचं जे तत्त्व, तो त्याचा धर्म. 

या अर्थाने पाहिलं, तर धर्म नाही, अशा खर्या अर्थाने "निधर्मी" असं या जगात काहीच नाही. कुणीच नाही. असूच शकत नाही.

माणसांचं पाहिलं, तर ज्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळतो (सुख नव्हे, आनंद) तो आपला धर्म, अशी ढोबळ व्याख्या आपण करू शकतो. यात सर्व मनुष्यजातीला लागू पडणार्या काही गोष्टी आहेत, व आपापल्या स्वभावानुसार आपल्याला लागू पडणार्याही काही गोष्टी आहेत. एखाद्या गायकाला जो आनंद एखादी सुंदर सुरांची लकेर घेताना होतो, तोच आनंद एखाद्या फुटबॉलपटूला एखादा सुरेख "गोल" मारल्यावर होतो. अगदी तोच आनंद - त्यात डावं-उजवं काहीही नाही. पण त्याच गायकाला फुटबॉल च्या मैदानात उतरवलं, किंवा खेळाडूला मैफिलीत गायला लावलं, तर दोघांचेही हातपाय कापायला लागतील. 

श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात्
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: 
(भगवद्गीता ३:३५)

अख्ख्या गीतेचं सार म्हणता येईल असा हा श्लोक हेच सांगतो. 

सगळ्यांची आपापली वाट आहे. सगळ्यांचा आपापला धर्म आहे. याचा हिंदू, ख्रिस्ती, ज्यू, मुस्लिम वगैरै संघटित "धर्मांशी" काहीही संबंध नाही. हा सर्वस्वी ज्याचा त्याचा, आपला-आपला मामला आहे. 

मात्र झालंय असं, की हा "स्वधर्म" शोधायची वाटच आधुनिक विज्ञानाने बंद करून टाकलेली आहे. इतरांना सिद्ध करून दाखवता येईल, पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवता येईल, तेच खरं, या संकुचित प्रवृत्तीनी ही वाट कशी चालता येईल? ही वाट चालायला कळप-वृत्ती सोडायला लागते. दुसरा म्हणतो, अनेक लोकं म्हणतात ते खरं ही समज सोडावी लागते. आपल्याला कशातून आनंद मिळतो, कशातून समाधान मिळतं, हे दुसरा कुणीही आपल्याला कसं सांगू शकेल? दुसर्याला आनंद देणारी गोष्ट आपल्याला आनंद देईल कशावरून? आईच्या पोटात नऊ महिने एकत्र वाढलेल्या जुळ्या भावंडांत सुद्धा एकाला जे आवडतं ते दुसर्याला आवडेलच असं सांगता येत नाही, तर करोडोंच्या जनसमुदायाला एकच गोष्ट कशी आवडू शकेल? शक्यच नाही ते. 

निधर्मतेच्या नावाखाली आपण थोडंफार कमावलं असेलही, पण जे गमावलं ते त्यापेक्षा कैक पटीनी जास्ती आहे. जे सुदृढ असतं ते धार्मिक असतं. जे आपल्या पायांवर उभं असतं ते धार्मिक असतं. तान्हं बाळ रांगायला आणि त्यानंतर चालायला लागतं, कारण तो त्याचा धर्म आहे. २ वर्षं झाली तरी बाळ चालायला लागलं नाही, तर तो दोष मानला जातो. आपलं आपण बोलायला लागलं नाही, तर तो दोष मानला जातो. याला वैद्यकीय भाषेत काहीही म्हणोत, पण त्या बाळाला धरून ठेवणारं सूत्र हवं तसं काम करत नाही, हाच त्याचा अर्थ. जे धार्मिक आहे, त्याची त्याच्या स्वरूपाशी नाळ घट्ट बांधलेली असते. जे धार्मिक असतं, ते स्वरूपाधिष्ठित असतं. आणि हिंदू परंपरेत स्वरूपाधिष्ठित असण्यापेक्षा उजवं काहीच नाही. 

रामरक्षेत रामाला उद्देशून 
"काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं" 
अशी एक ओळ आहे. इथे रामाला पूजापाठ करताना दाखवायचा हेतू नसून, त्याची स्वरूपाधिष्ठितता दाखवायचा हेतू आहे. 

निधर्मतेच्या नावाखाली आपण आपली सुदृढता गमावून बसतो आहोत, स्वरूपाधिष्ठितता गमावून बसतो आहोत. याला आधी सांगितल्याप्रमाणे भारतीय उपाय म्हणजे रामाला केवळ मंदिरात नाही, केवळ अयोध्येत नाही, तर मना-मनात आणून बसवणं. रामाच्या सत्य स्वरूपाचं ध्यान करणं. 

3 Idiots मधला रॅंचो म्हणतो, "Excellence का पीछा करो. Success झक मारके तुम्हारे पीछे आएगी". 

रामायणातला राम आणि चंदेरी पडद्यावरचा रॅंचो यांची ही तुलना थोडी विनोदी वाटली, तरी excellence च्या मागे धावणं हेच रामाच्या सत्य स्वरूपाचं खरं ध्यान आहे. प्रत्येक कृतीत उत्तमतेच्या मागे धावणं, म्हणजेच रामाच्या सत्य स्वरूपाचं ध्यान. 3 Idiots मधला रॅंचो खरं म्हणजे गरीब घरातून, कठीण परिस्थितीतून पुढे आलेला असतो. पण त्याचा उत्तमतेचा ध्यासच त्याला त्याच्या गंतव्यस्थानी घेऊन जातो (आणि करीना कपूर बरोबर त्याची जोडी पण जुळवून आणतो). नाईलाज म्हणून केलेल्या नामघोषा ऐवजी हा उत्तमतेचा रामघोष जर भारताच्या घरा-घरांत घुमायला लागला, तर भारत राजकीय महासत्ता व अध्यात्मिक विश्वगुरू व्हायला असा कितीसा वेळ लागेल!

- तन्मय विराज टिकेकर
२ जून २०२४

Monday, April 29, 2024

आपल्याला काय हवंय : बुद्धी, कृत्रिम बुद्धी, कि निर्बुद्धपणा?

 

परवा कृत्रिम बुद्धी (artificial intelligence) वरच्या एका परिसंवादात एक जण म्हणाला, की त्याला कृत्रिम बुद्धी बद्दल एक काळजी वाटते, की कृत्रिम बुद्धीवरती अवलंबून राहून आपलं मानवी मन आणि मेंदू विकलांग होऊन जाईल. मानवी मन आणि मेंदूचा वापर झाल्याने त्यांच्यावर गंज चढेल आणि कदाचित त्यांची पुन्हा भरून येणारी झीज होईल. हे ऐकून मला एकदम हसूच आलं

एकदम आठवलं, की आपल्या पूर्वजांनी यासाठीच संध्याकाळच्या परवचा ची सोय केली होती की! सगळ्यांनी मिळून रोजची स्तोत्रं नियमितपणे म्हटल्यानी स्मरणशक्ती मजबूत राहत असे. वाणीदोष नष्ट होण्याचा एकाग्रता वाढायचा फायदा तर वेगळाच. निधर्मीपणा, बुद्धीवाद, आणि विज्ञानवादाच्या अर्धवट पिकलेल्या संकल्पनांच्या जोरावर आपण ही परवचा ची व्यवस्था किती सहज निकालात काढली!

गणितातले पाढे पाठ करणं शालेय वयात कितीही क्लिष्ट वाटलं, तरी १०व्या वर्षी पाठ केलेल्या पाढ्यांचा आत्ता ३२व्या वर्षीसुद्धा उपयोग होतो, तेव्हा त्याची उपयुक्तता कळते. ज्यांनी तेव्हा पाढे पाठ केले नाहीत, त्यांनी "I have a calculator in my phone, why do I need to learn the tables?" म्हटलं की त्यांची कीवच करावीशी वाटते. फळभाज्या शेतात नाही तर सुपरमार्केट मध्येच पिकतात असं वाटण्याइतकंच हे हास्यास्पद

ज्या दासबोधाबद्दल समर्थांनी "नका करू खटपट | पाहा माझा ग्रंथ नीट | तेणे सायुज्याची वाट | गवसेल की ||" म्हटलं, तो वीस दशकांचा, दोनशे समासांचा दासबोध समर्थांनी कागदावर उतरवण्याआधी मनातल्या मनात "compose" करून ठेवला होता, हे लक्षात आलं की पुन्हा एकदा समर्थांच्याप्रती हात आपोआप जोडले जातात

आपल्या वेद-पुराण-उपनिषदांचं ज्यांनी लेखनाचा शोध लागण्याआधी गुरू-शिष्य परंपरेने तोंडी जतन करून ठेवलं होतं, त्या ऋषी-मुनींची तर आपल्याला कल्पनाही करवणार नाही

जाता जाता, विषय निघालाच आहे तर मनात आलेलं हेही बोलतो, की ब्राह्मणत्वाला हिंदू परंपरेत जास्त महत्त्व मिळण्याला, ज्यांनी हिंदू धर्मग्रंथ तोंडी गुरू-शिष्य परंपरेत पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवले, ते अलौकिक लोक कारण आहेत. तत्कालीन समाजव्यवस्थेला आधारभूत असलेले हे ग्रंथ पाठ करून ठेवण्याएवढी ज्यांची बुद्वी प्रगल्भ होती, त्यांना समाजात जास्त मान मिळावा, यात नवल ते काय? आजकालचे "ब्राह्मण" ब्राह्मणत्वाचा फुकटचा टिळा तर मिरवतात, पण वेद-पुराणं-उपनिषदं पाठ करणं तर सोडा, साधं वाचत ही नाहीत. हे कसले ब्राह्मण? असो. तो मुद्दा वेगळा. खरं म्हणजे ग्रंथ पाठ करायच्या पुढे ब्राह्मणत्वाची सुरुवात होते. आपण तर डोंगराच्या तळाशी जायलाच कंटाळा करतो. वेद-पुराणं-उपनिषदं पाठ करून पुढे आत्मशोधाचा डोंगर चढून जाणं तर दूरच राहिलं


"जुनं ते सोनं" हे जरी पूर्णतः बरोबर नसलं, तरी त्याला पर्याय म्हणून "सोपं ते सोनं" हे जे ब्रीदवाक्य आपल्या काळात अलिखितरित्या रूढ झालेलं आहे, ते कैक पटींनी वाईट


Dystopian literature मधल्या दु:स्थापित जगांमध्ये मनुष्यजात गुलामीत अडकवलेली दाखवलेली असते. पण "सोपं ते सोनं" या विचारधारेने आपल्याला आपणहूनच गुलामीत जायला भाग पाडले आहे. आपणच जर आपणहून गुलामीत पडायला आसुसलेले असू, तर आपल्यावर मालकीहक्क गाजवू पाहणार्यांची तरी काय चूक


(६ एप्रिल २०२४)